Saturday, September 26, 2009

निवडणुक

राज्यात काय चालले आहे ? मुख्यमंत्रांच्या गाडी वर चप्पलफेक, चिखलफेक, दगडफेक होते , माजी मुख्यमंत्रांच्या घरात घुसून मोडतोड केली जाते ।
यंदाच्या निवडणुकीत एकंदरीत सर्वच घृणास्पद, उबक आणणारया गोष्टी चालल्या आहेत।
जागापाटपाचा महाघोळ, असंतुष्टांची बंडाखोरी, माघारी , बंड, पक्ष बदलणे , हाणामारया , सारे असह्य झाले आहे।
आणि हे असे महाभाग आमच्या वर राज्य करणार ।
ठरवले आहे , यंदा या प्रस्तापितांपैकी कोणालाही चुकुनही मत द्यायचे नाही।
नवा पक्ष , नवीन तरुण उमेदवार यांनाच संधी द्यायची .

No comments: