Friday, April 17, 2009

सामना आणि मर्मभेद

अरुण साधु यांच्या सामना कादंबरीत कामगार नेता डिकास्टाच्या तोंडी (चित्रपटात कै.सतीश दुभाषी) एक वाक्य आहे "तर राज्याच्या मुख्यमंत्राला मंत्रालयासमोर जोड्याने हाणु"

त्या काळात हे असे जोडे फेकुन कोणी मारत नव्हते.

शशी भागवत यांच्या "मर्मभेद" या कादंबरीत एक जबरदस्त प्रसंग दिला आहे. प्रतिकुल परिस्थितीचे हुशार राजकारणी कसा धीरोद्धत्त वागुन आपल्याला हवे त्या संधीत त्याचे रुपांतर कसे करतो.

राजपुत्र कुणाल अचानक गायब झाले आहे, त्यांचा घात झाला असावा, यात काळेबेरे असावे हे जाणुन समस्त खवळलेली, संतापलेली जनता जाब विचारायला कृष्णांतच्या प्रासादासमोर जमते आणि संतापाच्या भरात कृष्णांताच्या वर व इतर सरदार, मंत्रांवर दगडधोंद्याचा वर्षाव करते. सारे जण पळुन आत जातात, फक्त कारस्थानी कृष्णांताशिवाय. तो धीराने सारा मार खात अचल उभा रहातो.

हळुहळु लोकक्षोम ओसरु लागतो, आणि मग कावेबाज कृष्णांत हरलेली बाजी उलटवतो.
तेव्हा ........

No comments: