Wednesday, December 12, 2007

ते रुपये गेले कोठे ?

विक्रमा आज तु माझ्या प्रश्नाचे उत्तर देवु नकोस, जा मी तुला सुट दिली, वेताळ वदला.
विक्रम संशयाने वेताळाकडे पाहु लागला, कारण कोणी काही सुट देतो म्हटले की त्यात काही तरी खोट असणार हे नक्कीच. (* * Conditions Apply )
वेताळा मग आपला मार्गक्रमण करतांना वेळ कसा काय जाणार ?
अरे विक्रमा, आज तु माझ्या नव्हे तर भारताच्या पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नाचा जबाब द्यावा असे मला वाटते.
विक्रमाचे धाबे दणाणले. वेताळाला हाताळाणे सोपे आहे पण ? असा कोणता अवघड प्रश्न आपल्या पंतप्रधानाने विचारला आहे ? तो बुचकळ्यात पडला.

"आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी केंद्र सरकारने राज्याला कोट्यावधी रुपये दिले. मात्र त्यातून राज्याचा विकास झालच नाही, ते रुपये गेले कोठे ?

विक्रमाने सवाल ऐकुन सुटकेचा निश्वास टाकला.

बा वेताळा, असला कसला रे सोपा सवाल विचारलास ? याचे उत्तर तर लहान पोरालाही ठावुक आहे. मग ते विचारणाऱ्याला ठावुक नसेल असे तुला प्रामाणिकपणॆ वाटते ? राज्याचा विकास होवो ना होवो, लाभार्थींचा विकास झाला न बास झाले. आणि मी असे ऐकले की तुझ्या पिंपळाच्या झाडाभवती यातुन बसण्यासाठी, सुशोभीकरणासाठी " पार " , "लादीकरण, वगैरे

विक्रमा, तु बोललास आणि मी हा चाललो.

No comments: