Saturday, August 25, 2007

ऐरोळी

एक वाटी बारीक रवा, एक वाटी चण्याचे पिठ, एक वाटी साखर एकत्र करुन हे सारे नारळाच्या दुधात दोन तास भिजवायचे. मग त्यात चारोळी, वेलची, किसमीस टाकावी. हे मिश्रण व्यवस्थीत ढवळुन घेतल्या नंतर, मंद आचेवर तापत ठेवलेल्या तव्यावर शुद्ध घरगुती तुपात पळीने टाकुन पसरावयाचे आणि दोन्ही बाजुने तळावे. कडा कश्या सर्व बाजुने खरपुस व्ह्ययला हव्यात. मधे मऊसुत असलेली ऐरोळी फार चवदार लागते.

श्रावणात आमच्याकडे एखाद्या सोमवारी हा पदार्थ करतात.


लिहीणार - बहुतेक डायबेटीस च्या उंबरठयावर उभा असलेला.

1 comment:

Vaidehi Bhave said...

mi hi kruti nakki karoon baghen...chavdar.