Tuesday, June 30, 2009

जा रे जारे बादरवा आणि कारी कारी बादरीया

या आठवड्यात मुंबई मधे मुसळधार बारीश होण्याची दाट शक्यता आहे असे राजाभाऊंच्या सुत्रांकडुन समजण्यात येते.
अचानक पर्जन्य अनुकुल होण्यास, सक्रिय होण्यास का सुरवात झाली याचा शोध घेता व त्याची कारणमीमांसा करतांना असे लक्षात आले की यास काल पासुन कर्नाटक संघात सुरु झालेला " वर्षा उत्सव २००९ " जबाबदार आहे.
उद्या पासुन नेहरु सेंटर मधे सुरु होणारा "मेघ मल्हार " त्यात भर घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात भरीस भर म्हणुन रविवारी पं. पंढरीनाथ कोल्हापुरे व त्यांचा शिष्य वर्ग क़ुमारजींचा " गीत वर्षा " हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

काल शौनक अभिषेकींनी धमाल केली. गौड मल्हार, कुक्कुभ मल्हार, वृंदावनी की मल्हार, सावन (मीरा भजन ) गावुन तापलेल्या रसीकांच्या मनास तृप्त केले. त्यांनी गायलेला रागमाला हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला. बंदीश एक पण अनेक रागांमधे गुंफलेली, मधेच एकेका ओळीर चक्क दोन दोन राग. असे कधी ऐकणे झाले नव्हते.

त्यांच्या आधी श्री. योगेश हुन्सवाडकर यांनी मीयां का मल्हार व नानक की मल्हार ऐकवुन योग्य ती वातावरण निर्मीती केली होती.
आता वेध लागले आहेत मंजुषा कुलकर्णी पाटील यांना ऐकण्याचे

No comments: