Friday, June 26, 2009

आषाढाच्या प्रथमदिवसे आणि भगत ताराचंद

आषाढाच्या प्रथमदिवसे ज्यांची प्रिया त्यांच्या बरोबर असते त्यांच्या खिशाची चांगलीच वाट लागते.
"तुला कसे कळले माझ्या मनात काय आहे ? "
"किती तरी दिवस झाले .... "
"कळले. आज संध्याकाळी आपण तुला मंगलदास मार्केट मधे जावुन एखाद्या ड्रेससाठी कपडा घेऊ, मग पर्स, आणि मग किती तरी दिवस विनयमधे पातळभाजी पाव खायला जायचे म्हणत होतीस ते ही करु "
"मी आज घरी जेवायला आम्ही नाहीत म्हणुन सांगितले आहे "
"माहिती आहे मला, आपण आता भगत ताराचंद मधे (मुंबादेवी) जेवायला जाणार आहोत."
तुला कसे कळॅले माझ्या मनात काय आहे ते? "
भगत तारांचंद मधली डाळ फ्राय तिची अत्यंत आवडती, त्यात तळुन घातलेला तो कांदा. ती शेव टौमेटोची भाजी, ती खस्ता रोटी, बटर मारके. मारवडीपद्धतीचे देशी जेवण येथे खुप चविष्ट मिळते.
(पुण्याला जातांना तळेगावच्या टोलनाक्या कडे त्यांची शाखा आहे. मुंबई वरुन आमच्या कडे पुण्याला गाडी घेवुन येतांना राजाभाऊंच्या मेहुणीच्या पोटात गोळा येतो. बहिणीचा फरमाईश असते, भगत ताराचंद कडे थांबायचे व डाळ फ्राय पार्सल आणायची )
पण त्यात तिचा एकच वांदा झाला, नेमके राजाभाऊंच्या हाती " मेघदुत " होते, चालतांना वाचत चालायचे, खरेदी करतंना वाचत खरेदी करायची आणि वाचत वाचत जेवायचे.

नशीब, भडका उडला नाही.

नाहीतर आषाढस्य प्रथमदिवसे ,झगडा आणि अबोला. यक्षाची एक लहानशी झलक मिळता मिळता राजाभाऊ बचावले

No comments: