Friday, June 26, 2009

हे मेघा

वैशाख वणव्याने सारा आसमंत भाजुन निघत असतो. सुर्याचा ताप साऱ्या प्राणिमात्रांना असह्य होत असतो।

वसुंधरा तळपत्या उन्हानें होरपळॅत असते। नद्या, नाले आटलेले असतात. पाण्याच्या एका थेंबासाठीं सारी सृष्टी आसुसलेली असते. तुझ्या वाटेकडे सारे प्राणीमात्र डोळे लावुन बसलेले असतात.


अशा वेळी तुझे आगमन झाले आणि तुझ्या सहस्त्रधारांचा वर्षाव सुरु झाला म्हणजे हा सारा ताप जादुच्या कांडीप्रमाणे क्षणात नाहीसा होतो आणि हवेत सुखद गारवा येतो !


दुर देशाटनाला गेलेले प्रणयी पुरुषसुद्धा विरहाग्नीने पोळॅत असतात ! तुझी चाहुल त्यांना मिलनाचा संकेत देते। रमणीच्या प्रेमाच्या वर्षावामुळें त्यांच्या विरहाग्नीसुद्धां शांत होणार आहे, हे तुच त्यांना कळव.


सुप्रसिद्ध लेखक, अनुवादक श्री. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी अनुवाद केलेल्या कालीदासाच्या मेघदुत मधुन साभार। कश्चितकांता - मराठी मेघदुत ।

No comments: