Thursday, June 26, 2008

साहित्य संमेलानात मराठी ब्लॉग्जची दखल घ्यावी

आता "साहित्य संमेलनं दक्षिण ध्रुवावर भरवा" ही एकदम टोकाची भुमीका झाली. कोणताही बदल त्वरीत स्विकारण्याची आपली तशी मानसीकता नसते. एखादे वर्षे जर का परदेशी साहित्य संमेलन भरवल तर बिघडते कुठे ? आज जागतीककरणात भौगोलीक सीमारेषा फार धुसर होत चालल्या आहेत, मराठी समाज आज अनेकविध कारणॆ जगभर परसत चालला असुन बऱ्यापैकी परदेशात स्थिरावला आहे. आज वर ही मराठी माणसे साहित्य संमेलनापासुन वंचीत राहीली आहेत. परदेशी राहुनही आपल्या मायबोलीशी हे अजुनही ऋणानुबंध ठेवुन असतात, अनेक प्रकारे साहित्याच्या प्रांतात भर घालत असतात.

आता या परदेस्थ भारतीयांच्या हाती ब्लॉगरुपी नवे माध्यम लागले आहे ज्याद्वारे आपल्या कलाकृतींना ते ब्लॉगमधे प्रकाशीत करत असतात. या साहित्य संमेलनामधे या नव्या माध्यमाची दखल घेणे आवश्यक आहे, ही काळाची गरज आहे, काळ झपाट्याने बदलत चालला आहे. या विषयी अधिकपणे येथे चर्चा व्हायला हवी.
कॄपया वाचा
कसं काय
साहित्य संमेलानात मराठी ब्लॉग्जची दखल घ्यावी

संमेलन काय फक्त भारतातच भरवायला हवीत काय ? या माहीतीतंत्रज्ञानाच्या युगात बेबबेस प्रक्षेपणामुळे प्रवास करण्याची गरजही उरलेली नाही. या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन साहीत्यिक, साहित्य संमेलनं अधिकाधिक जणांपर्यंत पोचु शकतात.

तेव्हा या नव्या युगाचे आपण आनंदाने, वादावादी टाळुन स्वागत करायला हवे. ( तसं बघायल गेल तर वाद आणि संमेलन यांचा अगदी जवळाचा संबंध आहे नाही का )

No comments: