Friday, July 24, 2009

लाटाच लाटा चहुकडे

"काय ग शाळेत नाही गेलीस ती आज, काय काकी घरला आली म्हणुन दांडी ? "
राजाभाऊंनी आपल्या पुतणीला विचारले.
"असे काका तु येडा का खुळा ? एवढे पण तुला कळत नाही आज केवढ्या मोठ्या , ह्या भल्यामोठ्याला लाटा उसळणार आहेत मुंबई मधे, आज शाळा बंद ."


सतर्केतेचा इशारा। आज शक्यतोवर मुंबईत अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडुन नका. दुरचित्रवाणीवर एका वाहिनीची निवेदीका कोकलत होती. वर्तमानपत्रातहीच चर्चा.

ही अतीउत्साही लोक शहराला कोठे घेऊन जाणार आहेत इंद्रदेव जाणे।


जणु ह्याच्या आधी पावसाळ्यात कधी समुद्रकिनारी मोठ्या लाटा उसळतच नव्हत्या, मुंबईमधे पावसाळ्यात कधी रस्तावर पाणी तुंबतच नव्हते. पावसाळ्यात मरिन ड्राईव्ह वर या लाटांच्या वर्षावात दरवर्षी पावसाळ्यात भिजायला नेहमीच लोक येत असतात, यात नवीन ते काय ?

यांनी मुंबईला घाबरट करुन टाकायला सुरवात केली आहे.

1 comment:

Narendra prabhu said...

खर आहे, अशा वाहिन्यांवर लोकांनीच बंदी घातली पाहिजे