Sunday, July 12, 2009

पुन्हा एकदा "आशा"






शनिवार आला. राजाभाऊ बायकोला म्हणाले ’चल आज तुला आराम , आज स्वयपाकघरात म्हणुन पाय ठेवायचा नाही " .

मस्त पावसाळी धुंदंफुंद नशीला माहोल, चमचमीत, मसालेदार जेवण जेवणाचा मोह काय आवरेना. काय मनी धरुन निघाले होते. मारे मनात मांडे खात होते. येथे जावु तेथे खाऊ.
पण.

पण जी बायको नवऱ्याच्या बेतात मोडता घालणार नाही (नेहमीच) , ती बायको कसली.

"अजीबात नको. आषाढ सुरु आहे. या दिवसात साधे, सात्वीक जेवावे."

मग ती आणि ते आपटॆ रस्तावरील "आशा डायनींग हॉल " मधे जेवायला गेले.
काचऱ्याची बटाटा भाजी ,वांग्यांचे भरीत , पडवळाची भाजी ( देवा तुच माझा रक्षणकर्ता , पडवळाची भाजी खाण्याचे मला धैर्य दे ), डाळभात, आणि रसम. अमर्यादीत जेवण. केवळ ५५ रुपयात. "

2 comments:

रोहन... said...

अहाहा ... सुग्रास जेवणाचे सुंदर छायाचित्र ... !!! :)

Sucharita Sarkar said...

Simple homely food is the best, I always feel. The picture was mouth-watering, esp as I am feeling rather hungry myself. It is lunch time!