Sunday, February 03, 2008

ऐसो कैसो आयो रिता रे

आज पहाटॆ पासुन मुंबईत थोडासा बेमौसमी पाऊस पडतोय. मध्यंतरीच बऱ्यापैकी थंडी होती. हे निर्सगाचे ऋतुचक्र असे अनियमीत होत चालले आहे.

लहानपणी दिवाळीत भल्यापहाटे अभ्यंगस्नानाच्या समयी चांगली कचकचुन थंडी असायची , कढत कढत पाण्याने राजा गोपीचंद स्नान व्हायचे, आता दिवाळीत ना तो पहाट गारवा राहिला आहे ना अभ्यंगस्नान.
जुन महिन्यात पावसाचे आगमन व्ह्यायचेच. पण आता पार ऑगष्ट चा मुहुर्त गाठ्ला जातो.

या अश्या ऋतुंबद्द्ल कुमारजींनी बहार रागात एक मस्त बंदीश रचली आहे

ऐसो कैसो आयो रिता रे
अंबुवा पे मोर ना आयो
कऱ्यो ना गुंजारे भंवरा रे !!
पीर बढ्योरे कोयल की
रंग ना खिल्यो हे फुलवारे !!

No comments: