Tuesday, January 15, 2008

लोक काय दोन्ही तोंडानी बोलतात

प्रिय श्री. रतन टाटा,
यांसी,
आपण काय कोणतीही टीका मनाला लावुन घेवु नकात. लोक काय दोन्ही तोंडानी बोलतात.
आधी सामान्यांच्या आवाक्यात चारचाकी मोटारगाडी नाही, त्यांना परवडेल अशी गाडी हवी, करत रडत होते.


आता गाडी येवु घातली आहे तर रस्तावरच्या गाडयांची संख्या वाढेल, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल, करत चिंता व्यक्त करु लागली आहेत.


आपले विचार आपण जेव्हा पुर्वी मांडलेत तेव्हाच या बाबीचा टिका करणाऱ्यांनी विचार करायला हवा होता, व आपल्या ते निदर्शनास आणायला हवे होते.


आपल्या गाडीची वाट पहाणारा

No comments: