Thursday, January 17, 2008

पतंगबाजी अजुन किती बळी घेणार ?

पतंगबाजी अजुन किती बळी घेणार ? आणि या बद्द्ल कोणाला जबाबदार ठरवणार ? धारधार मांज्यामुळे किती पक्षी जायबंदी होतात, मरतात याची आपल्याला फिकीरच नसते पण निदान मानवी जीवाचे तरी मुल्य आपण जाणायला हवे, ठेवायला हवे.
रस्तावरुन दुचाकीवरुन जाणारे , ज्यांचा या खेळाशी संबध ही नाही ते धारधार मांज्याने गळा चिरुन मरण पावतात, गच्ची वरुन पतंगबाजाच्या नादात वरुन खाल पडुन मुले, माणसे मरतात, जायबंद होतात, रस्तावर पतंग पकडण्याच्या नादान बेहोशीने धावल्या मुळे मुलांना अपघात होतात.
आपले सणात हे असेच,या प्रकारचे उपद्रावमुल्य असायला हवेच का ?
गोविदा, उंच दहीहंडी फोडतांना थर कोसळुन जखमी होणे, दिपावलीत फटाक्यांमुळे मुले भाजणे, ( माझ्या माहीतीत एका मुलाला आपला डोळा अनारामुळे गमवावा लागला ), फटाक्याचे ध्वनी,वायु प्रदुषण, होळीत पाण्यानी भरलेले फुगे मारल्या मुळे डोळ्यावर गदा येणे, गुलाल व ईतर कॄत्रीम रंगांमुळे ईजा होणे . गणेशोत्सावातील, नवरात्रीमधी ध्वनीप्रदुषण, त्या लाउडस्पिकरच्या भिंती, रस्ते अडवुन बांधलेले मंडप .
कोठेतरी आपण यातुन मार्ग काढायला हवा .
Time of India
MUMBAI: The Makar Sankranti festivities this year had a macabre touch. A stray 'manja' (the string that's used to fly kites) nearly slit Mira Road youth Santosh Shetty's throat on Tuesday afternoon along the busy Western Express stretch between Kandivli and Borivli

No comments: