Monday, October 05, 2009

बाहेरुन आतुन सर्वच जण एकत्रीत राज्य उपभोगणार आहेत..

उंदीर सापाचा नवा खेळ सुरु झाला आहे
कौरव पांडव भांडत आहेत
रयत तमाशा बघत राहिली आहे

कालपर्यंत भगवंत त्यांचे पाठीराखे होते
दारी त्यांच्या "वसंत"फुलवीत होते, "शरदा"च्या चांदण्याचा सडा घालत होते
काय करणार, आता तर भगवंतानीच पार्टी बदलली आहे.

अर्जुनाच्या मनी नवा संभ्रम आहे
मराठी माणसांनी मराठी माणसांनाच मत द्यायचे आहे ?
की मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी अमराठींचा पक्ष घ्यायचा आहे ?

एकंदरीत काय सगळी गंमत जंमत आहे.
बाहेरुन आतुन सर्वच जण एकत्रीत राज्य उपभोगणार आहेत.
राव पडले पंत चढले तरी जनता रोजच्या लढायीत मरणारच आहे.



No comments: