Wednesday, July 16, 2008

क्रिकेट आणि कब्बडी

आता लवकरच आषाढ अमावस्या येईल, मग सुरु होईल श्रावण मास. घरोघरी या निम्मीत्ते या सणांसाठीच्या खास रचल्या गेलेल्या व अलिकडच्या काळात विस्म्रुतीत जात चाललेल्या कथेचे कदाचीत वाचन होईल देखील.
एक आटपाट नगरी, मग तिचा राजा, त्याच्या दोन राण्या, एक आवडती व एक नावडती, अश्या अंगाने सुरु झालेल्या कथेचा शेवट मात्र गोड असायचा. प्रत्यक्षात गोड शेवट असता तर.
किंवा
अमावस्येला दिपपुजा झाल्यानंतर पार रात्र झाली की सारे दिवे गावाबाहेर पारावर जमतात, काही तेजस्वी, तर काही मलुल, मग त्यांच्यात चर्चा सुरु होती कोणाघरी कोणी काय खाल्ले याची.
त्यातलाच दोन दिवे भगभगीत तर दुसरा विझायला आलेला.
किंवा
आवडतीच्या घरी लक्ष्मी पाणी भरते तर नावडतीच्या घरी अठरा विश्वे दारीद्र, एक दादीगीरद्यात लोळते, पंचतारांकीत महालात रहाते पण सदा अत्रुप्त,असमाधानी. नावडती बिचार मिठभाकरी खावुन रहाते,आहे त्याच्यात समाधानी . कोणाकडुन काही अपेक्षा नाही, पण कोणी काही दिले तर अव्हेरायचे नाही हे व्रत.
पण,
गंमत म्हणजे दोन्हींचे "साहेब" एकच. हात लावतील तिथे सोने करतील.
पण.
क्रिकेट आणि कब्बडी , एक आपल्याच मातीतला खेळ, आपलाच, आपल्याच माणसांचा तर दुरसा परकीयां कडुन आलेला

क्र.

No comments: