Sunday, July 22, 2007

आम्हनी प्रतिभाताई राष्ट्रपती व्हयनी. अभिनंदन.

अखेर समस्त मराठी माणसाचे स्वप्न पुरे झाले . रायसीना हिलच्या तख्तावर प्रतिभा पाटील यांनी अखेर महाराष्ट्राचा दिग्विजयी झेंडा रोवला.
चला या निमीत्ते तरी आपल्या खेकडा वॄत्तीचा त्याग करुन महाराष्ट्रातील मंडळी एक झाली, गेली कित्येक वर्षे सातत्याने आम्ही हीच भुमिका मांडत होतो. यशवंतरावांच्या वेळी, शरदरावांच्या वेळीच जर सगळे एकत्र झाले असते, तर आज चित्र काही वेगळेच दिसले असते. पण अजुनही वेळ गेलेली नाही. राष्ट्रपती निवडणुकीच्या निमीत्ताने एकत्र आलेले सर्व जण, असचे लोकसभेच्या निवडणुकीमधे एकदिलने, एकमताने राहीले तर पंतप्रधानपदी ही मराठी माणुस बिराजमान झालेला दिसुन येईल. आता एकच लक्ष , दिल्लीचे तख्त, ज्यानी मराठयांना फार हुलकावण्या दिल्या आहेत. मराठा तितुका मिळवावा , अवघा महाराष्ट्र धर्म वाढववा. (अस संपादकीय लेख असायला हरकत नाही )

पण दादा, सदविवेकबुद्धी म्हणजे काय भानगड असते रे ?

अरे बाबा कुठे वाचलस रे हे ? आपल्याला त्याचाशी काय देणघेण आहे काय रे ?

आता याच निवडणुकीत नाही का भाजपाने आवाहन केले होते ?

ऐक तर, आता बघ नेहमी आपण वर्तमानपत्रात वाचतो , एक जण दुसऱ्याला आवाहन करीत असतो की आपण आपल्या सदविवेकबुद्धीला स्मरुन, व पटेल तेच योग्य करा !

अश्या वेळी आवाहन करण्याला अभिप्रित असते तर ते त्या दुसऱ्या माणसाने आवाहन करणाऱ्याचेच ऐकावे, त्याच्याच मतान व मनाप्रमाणे करावे. त्या विरुद्ध कॄती केलीच तर मग ती सदविवेकबुद्धी च्या विरुद्ध असणार असते. विरुद्ध पक्षाच्या लोकांनी, दुसऱ्याच्या उमेदवाराला मत दिले तर ते आपल्या सदविवेकबुद्धीला स्मरुन असते, (त्यात द्रोह, प्रतरणा नसते).

लोच्याच म्हणायचा की. सदविवेकबुद्धी पेक्षा आपला आदेश बरा, जास्त विचार करायला नको.

No comments: