Saturday, January 21, 2023

गिरगाव चौपाटीवरच्या सुखसागर मधे पावभाजी खायला.

 रात्रीचे पावणे दोन वाजलेले. कधीच न झोपत असलेली सदाबहार मुंबई अधिकच बहरात आलेली. दिवसभराची धावपळ थंडावली, माहोल रंगत चाललेला. मध्यरात्रीनंतरची मुंबई किती सुरेख असते हे युवा नेते श्री.आदित्य उद्धव ठाकरे ह्यांच्या "नाईट लाईफ" च्या संकल्पनेला विरोध करणाऱ्यांना कसे ठावुक असणार ?

रात्री दिड वाजता घराबाहेर असलेल्या  राजाभाऊंच्या समस्त परीवाराचे एकमत झाले, कधी नाही ते त्यांचे एकामेकाचे विचार जुळले. 

जरी रात्री जेवुन घराबाहेर निघाले असले तरी मध्यरात्र टळल्यानंतर नेहमीच भुक लागत असते. 

रात्री दोन सव्वादोन वाजता बंद होते हे ठावुक असल्यामुळे मग काय गाडी वळली गिरगाव चौपाटीवरच्या सुखसागर मधे पावभाजी खायला.





No comments: