Tuesday, November 05, 2013

तळोजा

कोणे एके काळी तळोजाला मिळणारी बिर्याणीची शान अलग होती. रात्री मुंबईमधुन मुद्दामुन खास बिर्याणी खाण्यासाठी गाड्‍या भरभरुन खवय्ये मंडळी वाट वाकडी करुन जायची. मग वाशी पुल बांधला गेला, तळोजा मार्गे होणारी मुंबई-पुणे वहातुक मंदावली आणि मग याची क्रेझ ओसरत गेली.

जेव्हा हे बिर्याणी प्रकरण ऐन भरात होते तेव्हा राजाभाऊंकडे गाडी नसल्यामुळे जाणे झाले नाही. 
काही वर्षापुर्वी तळोजाला जावुन ही बिर्याणी खायला ते गेले, पण तो पर्यंत खुप उशीर झाला होता.

आता बिर्याणी मिळते का नाही ठावुक नाही.

No comments: