Monday, November 04, 2013

रमण विलास

भर रस्त्यात समोरुन येणाऱ्या एका गृहस्थाची वाट अडवुन राजाभाऊ मधेच उभे राहिले आणि त्यांना जाब विचारला. 

तुम्ही असे का केलेत ? तुम्ही असे का वागलात ?

ते गृहस्थ काहीच बोलले नाहीत. शांत मुद्रेने त्यांनी राजाभाऊंकडे पाहिले व प्रसन्न होवुन खुप गोड हसले. त्यांना झालेली खुषी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसुन येत होती. त्यांना हा प्रश्नाचा आनंद झाला होता.

"तुम्ही तुमचे "रमण विलास " का बंद केलेत ? "

शाळेसमोरचे , दोन देवळासमोरचे ते दाक्षिण्यात पदार्थ मिळण्याचे उपहारगृह होते. अस्सल अगदी अस्सल डोसे तेथे मिळत. राजाभाऊंना रवा डोश्याची चव आणि चटक लागली ती ह्यांच्याच मुळे.छोटेसेच हे उपहारगृह होते

आजच्या रात्री गिरगावात जातांना ह्या शाळेतल्या सुखद आठवणी जाग्या झाल्या आणि ती जागा, ती चव आठवु लागली.

मग कधीतरी त्यांनी हा व्यवसाय बंद करुन स्पेयर पार्ट्सचे दुकान टाकले. हे या वस्तुंचे मार्केट .

No comments: