Sunday, December 16, 2007

स्वामी हरीदास संगीत संमेलन

"मला संगीत कळते पण वळत नाही". कट्यार काळजात घुसली या नाटकातील विदुषकाची ही खंत.
मग मी कशाकशाची खंत करु ? मला तर वळतही नाही आणि कळत ही नाही. काल स्वामी हरीदास संगीत संमेलनाच्या पहील्या दिवशी हि भावना फार प्रबळ होती. दोष असला तर माझाच. मीच त्या साठी काहीच प्रयत्न केले नाहीत. पण हे वैगुण्य कलेचा आस्वाद घेताना आड येवु नये म्हणजे पुरे. नाहीतर मला त्यातले काय कळते करुन कार्यक्रमला जाणेच झाले नाही तर जीवनातील अलौकीक अनुभुतीस मी मुकलेलो असीन.

कालच्या सत्रात सर्व प्रथम श्री देबासीश पटनाइक यांचे ओडीसी नॄत्य झाले त्यानंतर स्म्रिती मिश्रा व अमरसिंन्घा धनुजा यांचे कथ्थक , श्रीमती गीता राधाकॄष्णन यांचे मोहीनी अट्ट्म, अनुज मिश्रा यांचे कथ्थक, ऐश्वर्या राजगोपाल यांचे भरत नाट्यम, पं.कृष्णमोहन मिश्रा यांचे कथ्थक झाले.

No comments: